शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

कोल्हापूर उपशहर अभियंत्यास सभेबाहेर काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:52 IST

कोल्हापूर : व्हीनस कॉर्नरजवळील गाडी अड्ड्यातील अतिक्रमण कारवाई करण्यास गेलेल्या अधिकारी व कर्मचाºयांना ज्यांनी कारवाई थांबविण्याचे आदेश दिले त्यांच्यावर काय कारवाई करणार,

ठळक मुद्देस्थायी समिती : अतिक्रमण कारवाईत हस्तक्षेप करणाºयावर कारवाईची मागणी, अधिकारी धारेवरएका अधिकाºयाने महापौर हसिना फरास यांना चार-पाच दिवसांची मुदत द्यावी, अशी विनंती

कोल्हापूर : व्हीनस कॉर्नरजवळील गाडी अड्ड्यातील अतिक्रमण कारवाई करण्यास गेलेल्या अधिकारी व कर्मचाºयांना ज्यांनी कारवाई थांबविण्याचे आदेश दिले त्यांच्यावर काय कारवाई करणार, असा सवाल करत ताराराणी-भाजपच्या नगरसेवकांनी महानगरपालिका स्थायी समितीच्या सभेत अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी कारवाई न करताच दबावाला बळी पडून माघारी फिरलेल्या उपशहर अभियंता एस. के. माने यांना सभागृहातून बाहेर काढण्यात आले.

गाडी अड्डा येथील अतिक्रमण विरोधी कारवाई का थांबविण्यात आली, अशी विचारणा दिलीप पोवार यांनी सभागृहात केली. त्यावेळी एका अधिकाºयाने महापौर हसिना फरास यांना चार-पाच दिवसांची मुदत द्यावी, अशी विनंती केल्यामुळे ही कारवाई थांबविली. तथापि, लवकरच ही कारवाई पोलीस बंदोबस्तात पूर्ण केली जाईल, असे सभागृहात सांगितले. त्यामुळे संतप्त भाजप-ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी प्रशासनाला घेरले. वृषाली हॉटेलच्या बांधकामात हस्तक्षेप केला म्हणून जर एका नगरसेवकावर कारवाईचा प्रशासनाकडून प्रस्ताव तयार केला जात असेल तर मग आजही ज्यांनी अतिक्रमण कारवाईत हस्तक्षेप केला त्यांच्यावर काय कारवाई करणार, अशी विचारणा सत्यजित कदम, आशिष ढवळे यांनी केली. त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणीही केली; परंतु त्याला कोणीही ठोस उत्तर दिले नाही. त्यामुळे संतप्त सदस्यांनी उपशहर अभियंता माने यांना तुम्ही सक्षम नाहीत, असे सांगत सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले.

शहरभर अतिक्रमणाची कारवाई करणार होता, त्याचे काय झाले. प्रत्येक चौक व रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे याकडे आशिष ढवळे यांनी लक्ष वेधले. प्रशासनाने अतिक्रमण काढण्याचे नियोजन केले असून शहरातील पोलीस निरीक्षकांशी बंदोबस्ताबाबत चर्चा झाली आहे. लवकरच मोठी कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. ई वॉर्डमध्ये अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. फिरता जनरेटर घेण्याबाबत सांगितले होते. नऊ महिने हा विषय चर्चेत आहे. अजून प्रस्ताव आलेला नाही. लोक पाण्यासाठी आमच्या दारात येतात. प्रशासन गांभीर्याने काम करणार की नाही, अशी विचारणा उमा इंगळे, राहुल माने यांनी केली. पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठा कमी दाबाने झाला आहे. प्रत्येक ठिकाणी पंपिंग स्टेशनजवळ कमी-जास्त क्षमतेच्या मोटरी असल्याने किती के.व्ही.चा जनरेटर घ्यावा याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर केला जाईल, असे प्रशासनाकडून सांगितले. नगरोत्थान अंतर्गत केलेले बरेचशे रस्ते वाहून गेले आहेत. ठेकेदारांवर काय कारवाई केली, अशी विचारणाही यावेळी झाली. चर्चेत नीलोफर आजरेकर, रिना कांबळे, मनीषा कुंभार यांनीही भाग घेतला.अतिक्रमण हटाव मोहीम लवकरच; आठ दिवसांची मुदतगेल्या वर्षभरात शहरात झालेली अतिक्रमणे, चौका-चौकांत लावण्यात आलेल्या केबिन आणि त्याविरुद्ध होत असलेल्या तक्रारी याची गंभीर दखल आयुक्त अभिजित चौधरी यांनी घेतली असून लवकरच एक विशेष मोहीम राबवून या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांची अनधिकृत केबिन, अतिक्रमणे आहेत त्यांनी आठ दिवसांत काढून घ्यावीत, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. महानगरपालिकेच्या अनुमतीशिवाय शहरातील फुटपाथ, रहदारीचे चौक, मंडई, महानगरपालिकेच्या खुल्या जागा आदी ठिकाणी ज्यांनी अनधिकृतपणे कोणत्याही प्रकारची अतिक्रमणे, अनधिकृत शेड, बांधकाम केलेली आहेत तसेच जी अतिक्रमणे रहदारीला अडथळा ठरत आहेत अशी सर्व अतिक्रमणे स्वत:हून आठ दिवसांत काढून घ्यावीत, अन्यथा महानगरपालिका आपल्या यंत्रणेद्वारे केव्हाही व्यापक मोहिमेद्वारा हटविण्याची कार्यवाही सुरू करणार आहे, असे महापालिकेतर्फे प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.